#पुष्पक_विमान"


आज पाहिला कथानक छान आहे. वृद्ध आजोबा व नातू ह्या दरम्यान बालपण ते तारुण्य असा एक नाजूक काळ जो पडद्यावर अनुभवण्या सारखा आहे. काही, काही संवाद मनाला भिडणारे आहेत ( जे व्हाट्सअप वर वाचले होते ऐकायला तेवढेच मार्मिक ) "नातू हा आजोबांच्या आयुष्यातील शेवटचा जीवलग मित्र." व "आजोबा हे नातवाच्या आयुष्यातील पहिला जिवलग मित्र."
"नातू म्हणजे म्हाताऱ्या आजोबांचा संपत जाणारा काळ" ........ असे एक ना अनेक भुतकाळ जिवंत उभे करणारे संवाद खिळवून ठेवतात शहरी नात सून आणि आणि ग्रामीण अजल सासरे ह्यांच्यातील सांसारिक रुसवे फुगव चाळीतील जीवन व असलेली आपुलकी सुंदर मांडली ये.वृद्ध आजोबांची भूमिका मोहन जोशी व नातवाची भूमिका सुबोध भावे यांनी छान वठवली आहे.मात्र एकच गोष्ट खटकणारी आहे जळगाव खानदेश हे गाव कथानकात घेतलंय पण भाषेचा लहेजा विदर्भातील वापरला आहे तिथे एखाद दोन शब्दच फक्त खान्देशी अधून मधून एका यला येतात. बाकी अमरावती वैगेरे कथानकात घेता आलं असत.आपलं बालपण व आजोबा क्षणो क्षणी आठवतं राहतात एवढं निश्चित.


Image may contain: one or more people, people standing, text and outdoor

Comments

Popular posts from this blog